मुंबई पाऊस : सोलापूरकडे येणारी रेल्वे वाहतूक विस्कळीत
सोलापूर - रुळावर पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साचल्याने गाड्यांना धावण्यास रुळ उपलब्ध नाही. शुक्रवारी इंद्रायणी एक्सप्रेसचे अनेक प्रवासी पुण्याला जाण्यासाठी सोलापूर स्थानकावर दाखल झाले. स्थानकावर पोहचण्यानंतर गाडी रद्द झाल्याचे कळाले. रेल्वे प्रशासनाकडून इंद्रायणीच्या आरक्षित तिकीटधारकांना तिकीटाचे पैसे परत देण्याचे काम सुरु होते.