अलाहबाद दुर्घटनेतील मृतांची संख्या ३६वर
11/02/2013 13:06
अलाहबाद, दि.११ - कुंभमेळ्याहून परतणा-या भाविकांची अलाहबाद स्टेशनवर गर्दी उसळून झालेल्या चेंगराचेंगरीत ठार झालेल्या संख्या ३६ वर पोचल्याचे वृत्त आहे. रविवारी मौनी अमावस्येनिमित्त भाविकांनी गंगास्नान केले. त्यानंतर संध्याकाळी अलाहबाद स्थानकावर आलेल्या भाविकांमुळे पाच व सहा क्रमांकाच्या प्लॅटपॉर्मवर पाय ठेवण्यासही जागा उरली नव्हती. संध्याकाळी सातच्या सुमारास स्टेशनवरील पुलाचा कठडा तुटला आणि काही भाविक एकमेकांवर पडले. त्यावेळी एकच गोंधळ उडाल्याने चेंगराचेंगरी झाल्याचे रेल्वे अधिका-यांनी सांगितले.