वारीच्या स्वागताला सज्ज
20/06/2011 12:00
आषाढी वारीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आहे. भाविकांच्या स्वागतासाठी देहूकर, आळंदीकर सज्ज झाले आहेत. प्रशासनाने सुविधांविषयक कामे युद्धपातळीवर हाती घेतली आहेत.